ठरवलं होतं आयुष्यात
गुंतायचे नाही कुणात
नको ते वाट पाहणं
नको ते जीव लावणं
तुझ्या एका भेटीसाठी
तीळ तीळ झुरणं
पण ठरवल्याप्रमाणे
गोष्टी कश्या घडणार
जीव जडला तुझ्यावर
त्या एका क्षणांत
आता वाटतं,बरं झालं तो क्षण
नाही दवडला
पुढील सर्व सुखद क्षणांचा
बेस नाही हरवला
आता आहे तीळ तीळ झुरणं नि
जीव लावणं पण
हवंहवंसं वाटतंय वाट पाहणं
रजनी
No comments:
Post a Comment