अनामित संबंध त्यांचे लग्नानंतरही तिने जपले होते. दरवेळी माहेरी गेल्यावर एकदातरी त्याच्याशी हितगुज करायला ती जायची. तिच्या येण्याने तो ही प्रसन्न व्हायचा. पण ह्यावेळी त्याला भेटायला गेल्यावर तिला खूप दुःख झाले. ती सुन्न झाली कारण रस्ता रुंदीकरणासाठी त्याला मुळासकट तेथून उपटले होते.
सौ. रजनी भागवत✍️©®
13/6/22
No comments:
Post a Comment