लग्नाची गोष्ट असते मोठी रंजक
बोलणी सुरू होताच सगळे होतात हतचिंतक
सल्ल्यांवर सल्ले देतात इथे सगळे
वधूवरांचे मात्र इकडे चाले काहीतरी आगळे
लग्नाआधीच्या भेटीगाठी,खरेदी ,केळवण
आयुष्यात येते एक वेगळेच वळणं
डीजे,बँडबजा अन सजलेली घोडी
वरातीत नाचायची आगळीच गोडी
मेहंदी,हळदी अन सप्तपदीची लगबग
फोटोशूटसाठी उडते एकच गडबड
जेवणाच्या मग उठतात पंगतीवर पंगती
वधू-वर बिचारे उपाशीच तरंगती
विधी उरकताच होते पाठवणीची घाई
बाबा होतात दुःखी तर रडत राहते आई
आईबाबांची लाडकी लेक ,घरट्यातून उडून जाते
अन उंबरठ्यावरचे माप ओलांडून सौभाग्यवती होते
नवीन घरं,नवीन आयुष्य,नवीन नाती जोडते
अन अशी ही लग्नाची गोष्ट सुफळ संपूर्ण होते.
रजनी✍️

No comments:
Post a Comment