काळाचे घाव सोसाताना
एक मात्र जाणवलं
कळतनकळत त्याने
खूप काही शिकवलं
काळ पुढे सरकत जातो
उरतात फक्त आठवणी
आपण मात्र तिथेच राहतो
करीत त्यांची उजळणी
काळच देतो दुःख
अन काळच बनतो दवा
पण या सगळ्यासाठी
थोडासा संयम मात्र हवा
टाकीचे घाव सोसल्याशिवाय
दगडाला ही देवपण येत नाही
अन काळाचे घाव सोसल्याशिवाय
माणसाला माणूसपण येत नाही
रजनी✍️

2 comments:
वाह, खुपच छान..👌
मनःपूर्वक धन्यवाद नवरोजी
Post a Comment