Tuesday, 26 January 2021

ती,तो आणि "पाऊस"



ती एक अल्लड अवखळ आणि सुंदर मुलगी,एकुलती एक आणि आईबाबांची लाडकी.आईबाबांची लाडकी असली तरी ती लाडावलेली मुळीच नव्हती.तिला तिच्या परिस्थितीची पूर्ण जाणीव होती.वडील एका खाजगी कंपनीत तुटपुंज्या पगारावर कामाला आणि आई छोटे मोठे शिवणकाम करून संसाराला हातभार लावत होती.
           परिस्थिती बेताची असली तरी ,आहे त्यात समाधान मानून आनंदाने जगायचं बाळकडू तिला लहानपणासूनच आईबाबांकडून मिळाले होते,आणि ती ही शहाण्या मुलीसारखी आनंदाने राहत होती.आपल्या आईबाबांवर तिचं खूप प्रेम होतं आणि त्यांच्यावर अधिक आर्थिक भार पडणार नाही याची नेहमी दक्षता घेत होती.असेच रोजचे दिवस चालले होते पण तिच्या या सुखाला जणू कुणाचीतरी नजर लागली आणि तो दिवस उजाडला.26 जुलै च्या पावसाने सर्व होत्याच नव्हतं केलं.पावसात तिचे बाबा वाहून गेले आणि त्या धक्क्याने आईला हृदयविकाराचा झटका आला,आणि एकाच वेळी आईबाबांचे छत्र तिच्यापासून हिरावले गेले.
                हा आघात इतका मोठा होता की,ती अल्लड अवखळ मुलगी अचानक शांत झाली.आईबाबांच्या अचानक जाण्याला हा पाऊसच कारणीभूत आहे असे तिच्या मनाने घेतले.बाहेर जरा पाऊस पडु लागला की अस्वस्थ होऊ लागली .ढगांच्या सध्या गडगडण्याने पण घाबरू लागली.
               नातेवाईकांपैकी एक काका पुढे आले आणि तिला आपल्या घरी घेऊन गेले.काका आणि काकू स्वभावाने चांगले होते पण तिला या दुःखातून बाहेर पडायला खूप वेळ लागणार होता.तरीही आईबाबांची शिकवण ती विसरली नव्हती ,स्वतःचा अभ्यास सांभाळून काकू ला मदत करीत होती.लवकरच शिक्षण संपवून ती छोटे मोठे काम शोधू लागली.
                तिच्या मेहनतीने तिला एक ठिकाणी तात्पुरत्या स्वरूपाची नोकरी मिळाली.आता काकांना तिच्या लग्नाची काळजी सतावू लागली.लवकरच त्यांनी  त्यांच्या समाजाच्या वधूवर सूचक मंडळात तिची नाव नोंदणी केली.
ती देखणी असली तरी आईबाबांचे छत्र हरवलेली मुलगी म्हणून येणारे स्थळ नकार देऊ लागले.अशातच त्याच स्थळं सांगून आलं.तो दिसायला देखणा,रुबाबदार आणि मुख्य म्हणजे परिस्थितीने थोड्याफार प्रमाणात हिच्यासारखाच होता.पाहताक्षणी ती त्याला खूप आवडली.तिलाही तो पसंत होता पण अजूनही ती पुरती सावरली नव्हती.तिच्या काकांनी पुढाकार घेऊन त्यांना एकदा आपसांत भेटून निर्णय घेण्याची परवानगी दिली.ठरल्याप्रणाने ती दोघे एका हॉटेल मध्ये भेटले.शांत झालेली ती अधिकच संकोचली.पहिल्या भेटीतच त्याने ओळखले की,ही खूपच हळवी मुलगी आहे .
              दुसऱ्याच दिवशी त्याने त्याचा निर्णय काकांना कळवळा.मुलगा चांगला आहे म्हणून तिची संमती घेऊन काकांनी त्यांचं लग्न ठरवलं.हळूहळू लग्नाचा दिवस जवळ आला.दोघांचेही नियमितपणे फोनवर संभाषण सुरू असायचे.एकदा असेच तिच्याशी बोलताना त्याने त्याच्या लग्नानंतरच्या पहिल्या पावसाबद्दलच्या फॅन्टसी बद्दल सांगितले.त्याने ठरवले होते की, लग्नानंतरचा पहिला पाऊस तो फक्त आणि फक्त त्याच्या पार्टनरसोबत म्हणजे तिच्यासोबत एन्जॉय करणार होता.तो संपूर्ण दिवस तो तिच्यासोबत समुद्रकिनारी घालवणार होता.वास्तविक पाहता हा क्षण कुठल्याही मुलींसाठी आनंदाचा होता पण ती थोडीशी असहज झाली तिच्या मनातील पावसाची अढी तिला प्रतिसाद देण्यापासून थांबवू लागली.तिने घाईने फोन कट केला.
                 अचानक फोन कट झाल्याने तो गोंधळून गेला.यथावकाश त्यांचे लग्न झाले नवे नावलाईचे दिवस अगदी मजेत चालले होते.मुळातच समजूतदार असल्याने तो तिला प्रत्येक वेळी जपत होता समजून घेत होता.आणि अखेर तो दिवस आला व सुदैवानं तो रविवारचा होता.सकाळपासून आभाळ दाटल होत आणि कुठल्याही वेळी पावसाचं आगमन होणार होत.तो सकाळपासून खूप खुश होता आणि ती अस्वस्थ आतापर्यत त्याला तिच्या या अवस्थेबद्दल कळलं होतं आणि तिला यातून बाहेर काढायचं व आपली फॅन्टसी ही पूर्ण करायची हे त्यानं पक्के ठरवलं होतं.
          जशी पावसाला सुरुवात झाली त्याने तिला तयार व्हायला सांगितलं.ती अजूनही अस्वस्थपणे शून्यात बघत बसून होती.तो तिच्या जवळ गेला आणि हळुवारपणे तिला आपल्या मिठीत घेतले.ती आणखीनच त्याला बिलगली आणि बाहेर जाण्यास नकार देऊ लागली.त्याने तिचा हात हातात घेतला व बोलू लागला ,"तुझं माझ्यावर प्रेम आहे ना मग विश्वास ठेव काही होणार नाही,चल बाहेर मस्त भटकू आणि तरीही तुला बरं वाटलं नाही तर परत फिरू ओके."
                  ती तयार होऊन आली,त्याने बाईक काढली आणि तिचा हात छातीशी घट्ट धरून बाईक सुरू केली.त्याच्या स्पर्शाने ती सुखावली.तो बाईक तसा हळू चालवत होता परंतु पावसाचा जोर वाढला होता.इकडे हिची अस्वस्थता वाढू लागली ,"पावसामुळे बाईक स्लिप झाली तर किंवा बाईक चा अपघात झाला तर काय होईल?असे विचार तिच्या मनांत येऊ लागले त्याने तिचा चेहरा खूप चिंताग्रस्त झाला.त्याने साईड मिरर मधून तिचा चेहरा पाहुन तिला आश्वस्त केले.
              लवकरच ते समुद्रकिनारी पोहचले,बाईक पार्क करून तो तिच्या कमरेत हात घालून तिला समुद्रकिनारी घेऊन गेला.इतक्या दिवसांच्या सहवासाने आणि त्याच्या हळुवार वागण्याने ती खरंच त्याच्या प्रेमात आकंठ बुडाली होती म्हणूनच ती त्याच्यासाठी अधिकच पझेसिव्ह झाली होती.आता कुठलाही धक्का ती सहन  करण्याच्या मनःस्थितीत नव्हती.तिच्या मनाची घालमेल तो अगदीच समजू शकत होता.
                   समुद्रकिनाराच्या थोडेसे जवळ जाऊन तो तिच्यासमोर गुडघ्यावर बसला आणि नाटकीपणाने तिला म्हणाला,"हे सॅनुरिटा ,ये बारिष की बुंदे जिस शिद्दत से संमदर मे मिल रही है ,उतने ही शिद्दत से में तुमहें चाहता हु और दुनिया की कोई ताकत अब हमे जुदा नही कर सकती"
त्याचा हा नाटकी अविर्भाव बघून तिला हसू आलं.तिच्या ओठांवरच हसू आपल्या ओठांनी टिपत त्याने तिला जवळ ओढलं.थोडा वेळ असाच गेल्यावर ते समुद्रकिनारी चालू लागले.
         आता ती थोडीशी शांत झाल्यासारखी त्याला वाटली.त्याने तिला विचारलं या "लाटा पाहून काय वाटतं"?
"छानच वाटणार ना मी नाही समजले".तो बोलू लागला,"हे बघ या लाटा कश्या एकामागून एक आवाज करत एकाच गतीने किनाऱ्याकडे येत आहे ,त्यातला काही किनाऱ्याला स्पर्श करतीलही पण काही मागेच विरून जातील किनाऱ्यापर्यंत पोहचणार ही नाही.तसंच आपल्या आयुष्यात येणारी माणसं काही काळ आपल्याबरोबर असतात आणि कालांतराने लाटेसारखी विरून जातात,त्यामुळे दुःख होणं हे साहजिक असलं तरी आयुष्यात पुढे जाणं हे ही तेवढंच महत्वाचं आहे."
               "आईबाबांचे अचानक जाणं हे कुणाच्याही हातात नव्हतं की कुणामुळेही नव्हते.जेवढ्या लवकर तू या दुःखातून बाहेर येशील तेव्हढं तुलाच बरं वाटेल.आता तुझ्यासोबत मी आहे,तुझी काळजी घेण्यासाठी,तुझ्यावर प्रेम करण्यासाठी.तुला असं नाही वाटत का भूतकाळाचे दुःख कुरवाळत आणि भविष्यकाळाची चिंता करत जगण्यापेक्षा आपण आपला वर्तमान आनंदात घालवू."
               त्याचे म्हणणे तिला पटले आता ती स्वतः त्याच्या मिठीत शिरली व त्याचा कानात कुजबुजली "माझं तुझ्यावर आणि या आपल्या पावसावर पण खूप प्रेम आहे".हे ऐकून तो खूप खुश झाला,अन तिचा हात हातात घेऊन बोलला,"ठरलं तर मग आता प्रत्येक पहिला पाऊस आपण समुद्रकिनारी एकमेकांसोबत एन्जॉय करायचा.
                हळूहळू सूर्यास्ताची वेळ झाली होती पण त्यांच्या नात्यात नवीन सूर्योदय झाल्यासारखे ती,तो आणि त्यांचा पाऊस आपल्या घरट्याकडे परतत होती.

रजनी✍️

               


 


 

 

No comments:

अलक -अनामित संबंध

                 अनामित संबंध त्यांचे लग्नानंतरही तिने जपले होते. दरवेळी माहेरी गेल्यावर एकदातरी त्याच्याशी हितगुज करायला ती जायची. तिच्या य...