नाती नव्याने कळावी
असे काहिसे झाले
आपलेपणाचे मुखवटे
क्षणार्धात गळून पडले
ज्यांना समजत होते माझे
तेच परके निघाले
ज्यांच्याकडून नव्हती अपेक्षा
त्यांनीच दुःख दिले
आपलेपणाचे घाव हे
मी मूकपणे सोसले
ज्यांना नव्हती किंमत
अश्यांसाठी होते अश्रु ढाळले
पुरे झाले आता
मी मनाशीच म्हणाले
खूप भावनिक असणे
हे ही नाही चांगले.......
रजनी✍️©®
9/09/21

No comments:
Post a Comment