तगमग ही जीवघेणी
कातरवेळी जाणवते
दिवसाच्या संध्येला
तुझीच आठवण छळते
संधिप्रकाशात तुझीच
छबी मनी उमटते
अन आठवांनी तुझ्या
पाणी डोळा दाटते
देव्हाऱ्यात मग मी
सांजवात लावते
अन जोडूनि दोन्ही कर
तुझ्यासाठी प्रार्थना करते
रजनी✍️
अनामित संबंध त्यांचे लग्नानंतरही तिने जपले होते. दरवेळी माहेरी गेल्यावर एकदातरी त्याच्याशी हितगुज करायला ती जायची. तिच्या य...
No comments:
Post a Comment