कविता
ठरवून फक्त पत्रिका जुळतात
मन नाही जुळत
जुळलेच कधी छत्तीस गुण
तरीही त्यांचे नाही पटत
मनोमिलन आपोआप घडत
ठरवून काही होत नाही
गुणमेलन कितीही केले तरी
शेवटी संसार सुखी होत नाही...........
चारोळ्या
ठरवून होत नाही
ठरवून होत नाही
भेट दोन जीवांची
भिडताच नजर दोघांची
ठाव घेते हृदयाची
ठरवून होत नाही
ठरवून ही होत नाही
निर्णय तुला विसरण्याचा
माहित आहे ना तुला
तू प्राण आहेस माझा
रजनी✍️

No comments:
Post a Comment